Farmer loan waiver : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक मोठ्या संकटाचा सन्मान करावा लागतो. जसे की, दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणामध्ये योजना व अनुदान देते. अनेक वेळेस उत्पादन न झाल्यास व बाजारभाव योग्य न भेटल्याने शेतकरी कर्जबाजारी होतो. अशा वेळेस शासन शेतकऱ्यांना कर्जमाफी देते. राज्यातील शेतकऱ्यांवरती 31 हजार कोटी रुपयांचा बोजा आहे. शेतकऱ्याच्या माध्यमातून कर्जमाफीची मागणी सातत्याने केली जात आहे. Farmer loan waiver
निवडणुकीच्या पार्श्वभूमी वरती महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार कर्जमाफी होणार का असा प्रश्न शेतकऱ्यांना उपस्थित केला जात आहे. 10 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री अजित पवार हे शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार का अशी अपेक्षा सर्वांनाच लागलेली आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्प अधिवेशन 3 मार्च ते 26 मार्च 2025 या कालावधीमध्ये होणार आहे. तर 10 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अधिवेशनामध्ये कर्जमाफी किंवा सन्मान निधी योजनेत कोणतीही घोषणा होते का? महत्त्वाचे ठरणार आहे.
शेतकऱ्यांचे कर्जमाफी कधी होणार असा प्रश्न शेतकऱ्यांनी वारंवार उपस्थित केला जात आहे. मध्यंतरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी यावरती साफ नकार दिलेला आहे. ते म्हणाले की राज्याची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नाही कर्जमाफी करण्याचा विचार कोणताही सरकारचा नाही असे म्हणाले आहे. तसेच मी कोणत्याही माझ्या भाषणामध्ये कर्जमाफी देईल असे म्हटलं नाही. यामुळे मध्यंतरी या प्रश्नावरती पूर्णविराम लागला आहे. परंतु पुन्हा एकदा अर्थसंकल्प सादर होणार असल्याने या चर्चेला उधाण आले आहे.
हे पण वाचा | नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर! या तारखेला जमा केला जाऊ शकतात ₹2000 हजार रुपये?
किसान सन्मान निधी योजनेत वाढवणार
माहिती सरकारने वचननाम्यात शेतकरी सन्मान निधी योजना ₹12 हजार रुपयांवरून पंधरा हजार रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. 24 फेब्रुवारी रोजी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होणार असे सूचित केले. मात्र, नेमकी तारीख जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.
कर्जमाफी वर निर्णय का होत नाही ?
राज्य सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केले ने राज्याच्या तिजोरी वरती मोठा आर्थिक भार पडलेला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च झाल्याने सरकारकडे पुरेशी निधी व आर्थिक तणाव वाढला आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पष्ट सांगितले की राज्याच्या उत्पन्नात वाढ झाल्यानंतर कर्जमाफीचा विचार केला जाईल. यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल यामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांची भूमिका
काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी या कार्यक्रमांमध्ये स्पष्ट त्यांचे मत व्यक्त केले की, “अंथरूण पाहून पाय पसरायचे असतात” असे मत व्यक्त केले आहे यावरून सरकार सध्या मोठ्या आर्थिक निर्णयाच्या तयारीत नसल्याचे दिसत आहे व सरकारकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही.
शासनाचा संभाव्य पर्याय
सरकार थेट कर्जमाफी ऐवजी व्याजात सवलत किंवा अन्य मदतीसारखे पर्याय निवडू शकते. काही जाणकारांच्या मते, महायुती सरकार आपले कार्यकाळ संपण्याच्या टप्प्यावर असे मोठे निर्णय घेऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळेल याबाबत कुठेही माहिती समोर आलेली नाही.
1 thought on “Farmer loan waiver : शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार? महाराष्ट्र सरकार अर्थसंकल्पात घेणार मोठा निर्णय! | वाचा सविस्तर माहिती”