Chanakya Niti : श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहणं सोपं असतं, पण ते पूर्ण करण्यासाठी शिस्त, स्वच्छता आणि संयम या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आचार्य चाणक्य यांची निती आजही अनेकांसाठी मार्गदर्शक आहे. त्यांच्या लिखाणात अनेक ठिकाणी धन, प्रतिष्ठा आणि जीवनशैली यांच्याशी संबंधित महत्त्वाचे विचार नमूद आहेत. विशेष म्हणजे, चाणक्यांनी असे चार प्रकारचे लोक सांगितले आहेत, ज्यांच्या खिशात कधीच पैसा टिकत नाही आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य गरिबीतच जातं.
चाणक्य म्हणतात की देवी लक्ष्मी ही धनसंपत्तीची देवता आहे. मात्र ती प्रत्येकाकडे राहत नाही. ज्यांचं वर्तन, सवयी आणि जगण्याची शैली विशिष्ट प्रकारची असते, त्यांच्यावर लक्ष्मीचा कोप होतो. चला जाणून घेऊया कोण आहेत हे लोक Chanakya Niti
हे आहेत 4 लोक
स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणारे लोक
चाणक्य स्पष्टपणे सांगतात की, ज्यांच्या अंगावर, कपड्यांवर आणि घरात घाण असते, त्यांच्या घरात लक्ष्मी कधीच वास करत नाही. कारण देवी लक्ष्मीला स्वच्छता फार प्रिय आहे. कित्येक वेळा मेहनत करूनही पैसा हातात न टिकण्यामागे हा मोठा कारण असू शकतो.
दातांची निगा न राखणारे
जर एखाद्या व्यक्तीचे दात घाणेरडे असतील, तोंडातून दुर्गंधी येत असेल, तर ती व्यक्ती कितीही हुशार असली तरी तिच्यावर लक्ष्मी प्रसन्न होत नाही. दैनंदिन स्वच्छतेचा अभाव असलेल्यांना समाजातही आदर मिळत नाही, आणि यश लांब राहतं.
खादाड व लोभी लोक
अती खाणं ही नैतिक आणि आर्थिक अध:पतनाची सुरुवात असते, असं चाणक्य सांगतात. जो माणूस भुकेपेक्षा जास्त खातो, सतत अन्नाच्या मागे असतो, त्याला पैसा साचवता येत नाही. देवी लक्ष्मीला लोभ आवडत नाही. खाण्याचं व्यसन असलेल्यांना फालतू खर्च करण्याची सवय लागते.
आळशी आणि जास्त झोपणारे लोक
चाणक्य म्हणतात, सूर्योदयानंतर झोपणं, दिवसभर आळशीपणे वेळ घालवणं, हे गुण लक्ष्मीला दूर नेतात. आळशी माणसाला संधी ओळखता येत नाही आणि मिळालेल्या संधी देखील गमावतो. मेहनत, जागरूकता आणि शिस्त याशिवाय श्रीमंती मिळवणं अशक्य आहे.
चाणक्य म्हणतात, “ज्यांचं वर्तन घाणेरडं, स्वभाव आळशी आणि विचार शिस्तहीन असतात, त्यांच्यावर लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही.” म्हणून, श्रीमंत व्हायचं असेल तर या चार वाईट सवयी आजच सोडून द्या.
(Disclaimer : वरील दिलेली माहिती केवळ वाचकांसाठी बनवलेली आहे. याबाबत आम्ही कुठलाही दवा करत नाही त्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्या )
हे पण वाचा | चाणक्य म्हणतात पती-पत्नीने एकत्र राहून ‘हे’ केल्यास कधीही पैशाची चणचण भासत नाही! श्रीसंपत्ती नांदते त्या घरातच…