Ashadhi Wari Anudan 2025 | वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शासनाचा मोठा निर्णय, मिळणार 20 हजार रुपये अनुदान, वाचा सविस्तर माहिती

Ashadhi Wari Anudan 2025 | लाखो भाविकांची श्रद्धास्थान असलेली आषाढी वारी यांना पारंपारिक थाटात पार पडणार असून, यासाठी राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय वारकरी संप्रदायांसाठी मोठा ठरणार आहे. मानाच्या दहा पालकांसोबत येणाऱ्या तब्बल 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपयांच्या अनुदान देण्यास सरकारने मंजुरी दिली असून, याचा अधिकृत शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. ही बातमी समजतात वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. Ashadhi Wari Anudan 2025

दरवर्षीप्रमाणे यांनाही अनुदानाची घोषणा 2.21 कोटींचं वितरण

मागील वर्षी माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 2024 वर्षी प्रथमच वीस हजारांच्या अनुदानाची योजना लागू करण्यात आली होती. याच परंपरेनुसार 2025 वारकऱ्यांसाठी तीच रक्कम मंजूर करण्यात आलेले आहे. समाज कल्याण युवकाकडून प्राप्त माहितीनुसार, विभागीय आयुक्तांनी 1109 दिंड्यांची यादी शासनाला सादर केली होती. या प्रत्येकी दिंडीला ₹20,000 या दराने एकूण ₹2,21,80,000 इतके अनुदान वितरित करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, चरण सेवा चा उपक्रम राबवणार

राज्याचे दमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) हे वारकऱ्यांसाठी एक सेवेसाठी विशेष पाऊल उचलत असून, यंदा “मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष” यांच्या माध्यमातून चरण सेवा नावाचा उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये नाशिक, जालना, सातारा, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यातून निघणाऱ्या पालख्यांमध्ये सहभागी वारकऱ्यांना आरोग्य तपासणी, फिजिओथेरपी सेवा, औषधोपचार यांचा लाभ मिळणार आहे.

या सेवेसाठी 5000 वैद्यकीय अधिकारी, फिजिओथेरपीस्ट, मेडिकल विद्यार्थी आणि सेवकांची तैनात करण्यात आलेली आहे. नवारी मार्गावर 43 मुक्कामी ठिकाणी वैद्यकीय केंद्र उभारण्यात आली असून, तिथेच चरण सेवा दिली जाणार आहे. या उपक्रमासाठी शासकीय खाजगीय वैद्यकीय महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था आणि जिल्हा प्रशिक्षणाचे सहकार्य घेतले जात आहे.

पोलीस यंत्रणा सज्ज ६ जुलै रोजी वारीचा मुख्य सोहळा

वारीतील गर्दी, सुरक्षा आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी राज्य पोलीस दल सज्ज झाला आहे. यंदा एकूण 6000 पोलीस कर्मचारी, 3,200 होमगार्ड, तसेच राज्य राखीव पोलीस दल यांच्या सहा तुकड्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संपूर्ण पालखी मार्गावर ड्रोनच्या साह्याने देखरेख केली जाणार आहे, जेणेकरून कोणतीही अनुचित प्रकार टाळता येईल.

या निर्णयामुळे लाखो वारकऱ्यांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असून, सरकारच्या या पावलाने पंढरीची वारी अधिक सुयोजित आणि सुसज्ज होणार आहे. लाखो भाविकांच्या विठोबा रुक्माईच्या दर्शनासाठी होणाऱ्या या प्रवासाला आता शासनाची साथ लाभल्यामुळे वारी अधिक भावनिक, उत्साही आणि सुरक्षित होणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!