विमान कोसळण्यामागचं धक्कादायक कारण अखेर समोर! २५० पेक्षा अधिक निष्पाप जीव गमावले; देश हादरला

Ahmedabad plane crash : १२ जून २०२५ रोजी सकाळी नेहमीसारखीच एक एअर इंडियाची फ्लाइट लंडनच्या दिशेनं निघाली होती. फ्लाइट क्रमांक AI171. पण कोणीही कल्पना केली नसेल की ही उड्डाणच त्या २५० हून अधिक प्रवाशांसाठी शेवटचं ठरणार आहे. टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या काही क्षणांतच हे विमान अहमदाबादच्या मेघानी भागात नागरी वस्तीत कोसळलं आणि संपूर्ण भागात स्फोटासह आगीचे लोळ उठले. अगदी पाहता पाहता आसमंत धुराच्या जाळात गेला, आणि देश सुन्न झाला…

मृतदेहांची ओळखही होईना, DNA चाचणीचा आधार

या भीषण अपघातात प्रवाशांचे मृतदेह इतके जळून गेलेत की नातेवाईकांनाही ओळख पटवता येत नाही. प्रशासनाकडून आता DNA चाचणीद्वारे ओळख पटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत १९२ कुटुंबीयांचे DNA नमुने घेतले गेले आहेत आणि हे काम अजूनही सुरू आहे. रुग्णालयात नातेवाईकांसाठी खास हॉल, वैद्यकीय तपासणी आणि भावनिक आधारासाठी काउंसिलिंगची सोय केली गेली आहे. ज्यांनी आपले सर्वस्व गमावलं, त्यांच्यासाठी ही सोयही पुरेशी वाटत नाही, इतकी तीव्र वेदना त्यांच्या डोळ्यांत आहे…

अपघातामागे ‘कॉन्फिगरेशन एरर’? तांत्रिक तपासणीत धक्कादायक बाबी

या दुर्घटनेमागे विमानाच्या टेक ऑफवेळी झालेल्या तांत्रिक गोंधळाचा (Configuration Error) मोठा हात असावा, असं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. विमान अवघं ८२५ फूट उंचीवर आणि ३२० किमी/ताशीचं वेगावर होतं हे प्रमाण खूपच कमी. फ्लॅप्स नीट उघडले नव्हते, इंजिनचा थ्रस्ट कमी होता, गियर खाली होते या सर्व चुकांमुळे विमान उंच झेप घेऊच शकले नाही. वरून ४३ अंश सेल्सियसचा उष्मा, जड वजन आणि पायलट्समधील समन्वयाचा अभाव या सर्व घटकांनी अपघात घडवून आणला. म्हटलं तर मानवी चूक, म्हटलं तर व्यवस्थेतील हलगर्जीपणा पण शेवटी त्याचा फटका निष्पाप प्रवाशांना बसला.(Ahmedabad plane crash)

या दुर्घटनानंतर T2 टर्मिनलवर मदत केंद्र सुरू करण्यात आलं आहे. नातेवाईकांसाठी बसेस, टॅक्सी, भोजन, बसण्याची सोय केली गेली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी काल घटनास्थळी भेट दिली होती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः अहमदाबादला येणार आहेत. त्यामुळे परिसरात प्रचंड बंदोबस्त लावण्यात आला आहे. ही दुर्घटना केवळ देशापुरती मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय लक्ष वेधणारी ठरली आहे.

या अपघातात ब्रिटन, कॅनडा आणि पोर्तुगालमधील प्रवाशांचाही समावेश असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे हे विमान एका मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळलं, त्यामुळे काही विद्यार्थीही मृत्युमुखी पडले. अनेक कुटुंबांच्या जगण्याचा केंद्रबिंदू गेला… आई-वडील, पती-पत्नी, भाऊ-बहीण – अनेक नात्यांची अखेर झाली…

आता सगळ्यांच्या नजरा आहेत त्या DNA चाचण्या आणि पोस्टमार्टम अहवालाकडे. अपघात कसा घडला? चूक कुणाची होती? आणि यातून काय शिकावं? हे प्रश्न केवळ प्रशासनालाच नव्हे, तर संपूर्ण देशाला सतावत आहेत. ही दुर्घटना कोणाचं तरी दुर्लक्ष, चुकीचा निर्णय किंवा व्यवस्थेतील त्रुटीचं भयंकर उदाहरण ठरली आहे

Leave a Comment

error: Content is protected !!