Crop Insurance: महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शेतकऱ्यांना शेती पिकवत असताना अनेक नैसर्गिक आपत्यांचा सामना करावा लागत असतो. यामध्ये कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ यासारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी राज्य सरकारने सुधारित पिक विमा योजना राबवली आहे. 2020 पासून सुरू झालेल्या पिक विमा योजनेचा सखोल अभ्यास करून आणि त्यातील त्रुटी दूर करून 2025-26 या वर्षासाठी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या आधारित ही नवीन योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेत नेमके काय बदल आहेत आणि शेतकऱ्यांसाठी कसे फायदेशीर ठरतील हे आपण सविस्तरपणे या लेखात जाणून घेणार आहोत.
केंद्र सरकारच्या cup and Cap model 80:110 नुसार या योजनेची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई मध्ये अधिक पारदर्शकता आणि स्थिरता निर्माण होणार आहे. खरीप हंगाम 2025 आणि रब्बी हंगाम 2025-26 या वर्षासाठी ही योजना राज्यात राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी योग्य विमा कंपन्यांची निवड ही करण्यात आली आहे. Crop Insurance
सोन्याच्या दरात मोठी घसरण! खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी; जाणून घ्या आजचे 10 ग्राम सोन्याचे दर
पिक विमा योजनेचे उद्दिष्टे
या सुधारित पिक विमा योजनेमागे शासनाची काही प्रमुख उद्दिष्टे आहेत. ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
- नैसर्गिक आपत्ती कीटक आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळेल.
- पिकाच्या नुकसानीनंतर अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे आर्थिक धैर्य राखणे या योजनेचा उद्देश आहे.
- शेतकऱ्यांना नवीन आणि सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान तसेच सामग्री वापरण्यासाठी प्रोत्साहन देणे ज्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ होईल.
- कृषी क्षेत्रासाठी पतपुरवठा सातत्याने उपलब्ध राहील यामुळे शेतकऱ्यांना जोखमी मुक्त शेती करता येईल आणि अन्नसुरक्षा पिकाचे विविध करण तसेच कृषी क्षेत्राचा वेगाने विकास होईल. Crop Insurance
हे पण वाचा|1 ऑगस्टपासून 7/12 उताऱ्यासंदर्भात नवीन नियम लागू होणार! शेतकऱ्यांना मिळणार नवीन फायदा; वाचा सविस्तर
नवीन योजनेचे फायदे
या सुधारित योजनेचे अनेक वैशिष्ट्ये आहेत शेतकऱ्यांना पूर्णपणे फायदा देत आहेत.
- ही नवीन योजना केवळ अधिसूचित केलेल्या पिकांसाठी आणि अधिसूचित क्षेत्रासाठीच लागू असेल. यामुळे योजनेचा लाभ योग्य ठिकाणी पोहोचण्यास मदत होईल.
- प्रधानमंत्री पिक विमा योजना ही कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी फायद्याचे आहे. त्यामुळे कोणावरही शक्ती नाही ज्याला गरज वाटेल तो सहभाग घेऊ शकतो.
- अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी खातेदार नसलेल्या परंतु कुळाने किंवा भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. मात्र यासाठी त्यांना नोंदणीकृत भाडे करार पिक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे.
- शेतकऱ्यांनी पिक विमा भरण्यासाठी खरीप हंगामासाठी दोन टक्के रब्बी हंगामासाठी एक पॉईंट पाच टक्के आणि खरीप व रब्बी हंगामासाठी नगदी पिकासाठी 5% अशा मर्यादित ठेवण्यात आला आहे यामुळे शेतकऱ्यावरील आर्थिक भार खूप कमी होणार आहे.
- खरीप हंगाम 2025 आणि रब्बी हंगाम 2025 26 वर्षासाठी सर्व अधिसूचित पिकांसाठी जखमेस्तर 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे.
हे पण वाचा|26 जूननंतर या जिल्ह्यात पडणार धो-धो पाऊस! जाणून घ्या पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज…
80:110 cup and Cap model ची अंमलबजावणी
ही योजना एकूण बारा जिल्हा समुहासाठी निवडलेल्या पिक विमा कंपन्या मार्फत सन 2025 26 एका वर्षावरील cup and Cap model 80:110 नुसार राबवण्यात येईल. यामध्ये नुकसान भरपाई चे पूर्णताईत व संबंधित विमा कंपनीवर राहणार आहे. विमा कंपन्या एका हंगामात जिल्हा समूहातील एकूण जमा विमा हप्ता रकमेच्या 110% किंवा एकूण विमा संरक्षित रकमेवर बर्न कॉस्ट अनुसार येणारा विमा हप्त्याच्या 110% पैकी जे जास्त असेल त्या पर्यंत दायित्व स्वीकारेल. या पुढील दैत व राज्य शासन स्वीकारेल गर्दीय पिक विमा नुकसान भरपाई पेक्षा कमी असेल तर विमा कंपनी जमा विमा हप्ता रकमेच्या जास्तीत जास्त 20 टक्के रक्कम स्वतःकडे ठेवेल आणि उर्वरित रक्कम राज्य शासनाला वेळेत परत करेल हा बदल शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे कारण यामुळे नुकसान भरपाईची प्रक्रिया अधिक प्रभावी होणार आहे.
हे पण वाचा|शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! सौर कृषी पंप धारकांच्या अडचणीवर मिळणार तात्काळ उपाय, शेतकऱ्यांना या सुविधा मिळणार..
पिक विमा योजनेत अनेक घोटाळे झाले आहेत. मात्र आता या योजनेत मृत शेतकऱ्यांच्या नावे किंवा इतर अवैध मार्गाने पीक विमा काढला गेल्यास तो रद्द करण्यात येईल यामुळे योजनेत पारदर्शकता निर्माण होणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी किंवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. यामुळे शेतकऱ्यांची योग्य पटवून लाभार्थी शेतकऱ्यांनाच लाभ मिळेल. पिक विमा नुकसान भरपाईचा लाभ घेण्यासाठी ई पीक पाहणी करणे देखील आवश्यक आहे. ही डिजिटल नोंदणी प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी सुईची ठरेल आणि योग्य माहिती उपलब्ध होईल.
पीक पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा खूप उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या इतर बाबीमुळे हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोग आधारे किंवा तांत्रिक उत्पादन आधारे सदर महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरून नुकसान भरपाई देय केली जाईल. या सुधारित पिक विमा योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानी पासून मोठे संरक्षण मिळत आहे. ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत करेल आणि त्यांना अधिक आत्मविश्वासाने शेती करण्यास प्रोत्साहन देईल. सरकारच्या या दूरदृष्टीमुळे कृषी क्षेत्रात एक नवीन ऊर्जा निर्माण होईल अशी आशा आहे.