26 जूननंतर या जिल्ह्यात पडणार धो-धो पाऊस! जाणून घ्या पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज…

Panjabrao Dakh Havaman Andaj: सध्या महाराष्ट्रातील हवामानात होणारा बदल शेतकऱ्यांना संभ्रमात टाकत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात पावसाने धुमाकूळ घातला होता मात्र त्यानंतर आता पुन्हा पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. राज्यात झालेल्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. काही ठिकाणी पाणी सोडण्यात आलं आणि भूगर्भातील पाण्याची पातळ ही वाढली आहे. मात्र आता राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वसरल्याचा दिसत आहे. अनेक भागांमध्ये पावसाची स्थिती निर्माण होत आहे मात्र वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे पाऊस बरसत नाही. त्यामुळे पुढील जोरदार पाऊस कधी बरसणार हा प्रश्न राज्यातील प्रत्येकांच्या मनात संचार करत आहे.

दरम्यान प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी महत्त्वाचा हवामान अंदाज दिला आहे. डख यांनी 23 जून रोजी दिलेला ताजा अंदाज अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांच्या मते येत्या काही दिवसात पावसाचे स्वरूप मिश्र राहणार आहे. राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस होण्याची शक्यता खूप कमी असून ठराविक भागांमध्ये मध्यम ते हलक्या सरी बरसणार आहेत. त्यानंतर 26 जून नंतर हवामानात मोठा बदल होणार असून राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे.

हे पण वाचा|शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! सौर कृषी पंप धारकांच्या अडचणीवर मिळणार तात्काळ उपाय, शेतकऱ्यांना या सुविधा मिळणार..

पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार कोकणात पावसाची स्थिती कायम राहणार आहे. म्हणजेच कोकण किनारपट्टीवर पाऊस थांबणार नाही याव्यतिरिक्त सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर सुरूच राहणार आहे. हवामान खात्याने या भागासाठी आधीच अलर्ट जारी केला असून नागरिकांनी या भागात सावधानगिरी बाळगवणे आवश्यक आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील रहिवाशांनी पुढील काही दिवस अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. Panjabrao Dakh Havaman Andaj

विदर्भ आणि मराठवाड्यात कसे राहणार वातावरण

23 आणि 24 जून दरम्यान विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, वाशिम, बुलढाणा हिंगोली, नांदेड आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी पडणार असल्याची शक्यता आहे. मात्र पंजाबराव डख यांनी हे स्पष्टपणे सांगितले आहे की, हा पाऊस संपूर्ण जिल्ह्यात न पडता काही निवडक ठिकाणी हजेरी लावणार आहे. याचा अर्थ असा होतो की एकाच जिल्ह्यात चांगला पाऊस पडेल तर बाकीच्या भागांमध्ये कोरडे वातावरण राहील.

हे पण वाचा|महाराष्ट्रात पावसाची विश्रांती! आता पुन्हा कधी येणार पाऊस? हवामान विभागाने काय सांगितले? पहा सविस्तर…

23 ते 25 जून या कालावधीत धाराशिव, लातूर, परभणी, बीड, नांदेड या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये थोड्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे. पण या ठिकाणी पावसाचे स्वरूप विखुरलेले आहे. काही भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसतील तर काही ठिकाणी पावसाचे चिन्ह देखील दिसणार नाही. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अजूनही दमदार प्रवासाची वाट पहावी लागणार आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या जोरदार वारे वाहत आहे या बदलांवर पंजाबराव डख यांनी एक महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवला आहे. यांच्या अंदाजानुसार 26 जून पासून काही भागांमध्ये हे वारे थांबतील आणि 26 जून नंतर संपूर्ण राज्यात पावसाचे वातावरण तयार होऊन जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

राज्यातील हे वारे थांबल्यानंतरच पुन्हा पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होईल असे त्यांनी सांगितले आहे. वाऱ्याचा जोर कमी होणं हे चांगल्या पावसाचे सुचक मानले जाते. त्यामुळे 26 जून नंतर महाराष्ट्रात पावसाची मोठी वाढ होईल अशी शक्यता आहे. पुढील काही दिवसात महाराष्ट्रात पावसाचे जोरदार आगमन दिसून येईल. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस दमदार हजेरी लावणारा असून विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र 26 जून नंतर वाऱ्याचा जोर कमी झाल्याने संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं सर्वांनीच पुढील काही दिवसातील हवामानावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!