३० जूनपासून ‘या’ राशींवर येणार मोठं संकट! हा त्रास सहन करावा लागणार

Astrology Today | ज्योतिषशास्त्रात जेव्हा शनी, मंगळ आणि केतू एकत्र येतात, तेव्हा ते संयोजन शुभापेक्षा अशुभ परिणामच जास्त दाखवतं. आणि यंदा ३० जूनपासून असंच काहीसं होणार आहे. या तीन ग्रहांची घातक युती काही निवडक राशींसाठी संकट घेऊन येणार आहे. विशेषतः मेष, सिंह आणि कन्या राशींना सावध राहावं लागणार आहे. Astrology Today

मेष (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या तणावपूर्ण ठरू शकतो. घरात एखादी मोठी गरज अचानक उभी राहू शकते. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष नको विशेषतः रक्तदाब, थकवा, डोकेदुखी यांसारख्या त्रासांकडे दुर्लक्ष केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. जोडीदाराशी नातं थोडं तुटक वाटू शकतं, म्हणून बोलताना शब्द जपून वापरावेत.

सिंह (Lion)

सिंह राशीच्या लोकांसाठी ही युती जरा धोक्याची आहे. ऑफिसमध्ये कामाचा तणाव वाढेल. काहींच्या नोकरीवरही गदा येण्याची शक्यता आहे. घरातही वातावरण थोडं तापलेलं वाटेल वडीलधाऱ्यांशी मतभेद होतील, पण संयम राखा. आरोग्यावर विशेष लक्ष द्या, कारण जुनं दुखणं पुन्हा डोकं वर काढू शकतं.

कन्या (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ मानसिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या खूप झगड्याचा असणार आहे. अनावश्यक खर्च अचानक वाढतील. कोर्ट-कचेर्‍याचे विषय असतील, तर थोडी निराशा वाटू शकते. याशिवाय शरीराला थकवा येईल, डोळ्यांवर ताण जाणवेल, झोपेची कमी भासेल. सणासुदीच्या काळातही मन चिंतेत राहील.

(Disclaimer: वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही. कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी वैयक्तिक विचार करा.)

Leave a Comment

error: Content is protected !!