Construction Workers Pension Scheme: राज्यातील शहर उभी करणारे दिवस रात्र कष्ट करणारे लाखो बांधकाम कामगार महाराष्ट्रात आहेत. या बांधकाम कामगारांच्या कामातून आणि महिन्यातूनच मोठमोठ्या इमारती व पुणे तयार होतात. पण त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याचं काय असा प्रश्न आता महाराष्ट्र सरकारला महत्त्वाचे पाऊल उचलण्यास भाग पाडत आहे. महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळाने 60 वर्षावरील बांधकाम कामगारांसाठी एक पेन्शन योजना जाहीर केली आहे. ज्यामध्ये त्यांना दरवर्षी 12 हजार रुपये थेट बँक खात्यामध्ये दिले जाणार आहेत. ही योजना लवकरच कार्यान्वित होणारा असून तिची रचना बांधकाम कामगारांना आर्थिक धैर्य देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेली आहे.
ही योजना कोणासाठी आहे?
महाराष्ट्र शासनाची ही पेन्शन योजना महाराष्ट्र भवन व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत असलेल्या कामगारांसाठी आहे. सध्या राज्यात सुमारे 37 लाख नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत. या योजनेमुळे निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या आणि आतापर्यंत मंडळाच्या इतर लाभापासून वंचित राहिलेल्या कामगारांना मोठा दिलासा मिळत आहे. विशेष साठ वर्षावरील कामगारांना सध्या नूतनीकरणाची परवानगी नसल्यामुळे त्यांना अनेक योजनेचा लाभ घेता येत नव्हता. मात्र ही नवीन पेन्शन योजना अशा नागरिकांसाठी दिलासा देण्याचे काम करत आहे.
पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा; पहा जिल्ह्यांची यादी..
अर्ज कसा करावा..?
या योजनेला अर्ज कसा करावा अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन प्रणाली द्वारे केले जाईल. ज्यामुळे त्यात पारदर्शकता आणि सुलभता येईल. एकात्मिक संगणक प्रणालीचा वापर केला जाणार असल्याने अर्ज प्रक्रियेत कोणतीही गुंतागुंती राहणार नाही. तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर पात्र व्यक्तींना पेन्शन नंबर प्रमाणपत्र दिले जाईल आणि त्या प्रमाणपत्र आधारे पेन्शन मिळण्यास सुरुवात होईल. यामुळे कामगारांना सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. त्यांना घरबसल्या या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
पेन्शन योजनेसाठी पात्रता
या पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी काही विशेष निकष पूर्ण करणे आवश्यक आहेत.
- वय: अर्जदाराचे वय 60 वर्षापेक्षा अधिक असावे.
- सदस्यता: महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदणी असणे आवश्यक आहे.
- कामकाज अनुभव: मागील एका वर्षात किमान 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचा अनुभव असावा.
- इतर योजनेचा लाभ: अर्जदार EPF आणि ESI योजनेचा लाभार्थी नसावा.
बांधकाम कामगार पेन्शन योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे, जर नवरा आणि बायको दोघेही बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असतील तर त्यांना दोघांनाही स्वतंत्रपणे पेन्शन मिळू शकते. या नियमामुळे बांधकाम कामगार कुटुंबीयांना दुहेरी आर्थिक आधार मिळेल. म्हणजे या कामगार कुटुंबीयांना वार्षिक 24 हजार रुपये पेन्शन मिळू शकते.
हे पण वाचा| गोड तेलाच्या किमतीत होणार मोठी घसरण! सरकारने घेतला मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर…
मृत्यूनंतर पेन्शन मिळणार का?
आता अनेकांना असा प्रश्न पडतो की, या योजनेअंतर्गत मृत्यूनंतर देखील पेन्शन मिळणार का? तर याचे उत्तर आहे हो, पेन्शनधारक मृत्यू झाल्यास पेन्शन थांबणार नाही. जर मृत्यू झालेल्या पेन्शन धारकाचा जीवनसाथी जिवंत असेल तर ही पेन्शन त्याला देण्यात येईल. यामुळे कामगारांच्या निधनानंतर देखील त्यांच्या कुटुंबीयाला आर्थिक सुरक्षा मिळेल. मात्र जर जीवनसाथी आधीपासूनच पेन्शन धारक असेल तर त्यांना दुहेरी लाभ दिला जाणार नाही. Construction Workers Pension Scheme
दरवर्षी हयातीचा पुरावा देणे आवश्यक
पेन्शन योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी पेन्शनधारकांना दरवर्षी स्वतःच्या अस्तित्वाचा प्रवाह म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट सादर करणे बंधनकारक आहे. ही एक नियमित प्रक्रिया असून ती पेन्शनचा गैरवापर टाळण्यासाठी मदत करते. यासोबतच जर पेन्शन धारकाला आपलं बँक खाते बदलायचे असेल किंवा वारस नोंदवायचा असेल तर त्यासाठीही वेगळी आणि सुलभ प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हे पण वाचा| सोन्याचे दर गगनाला भिडले..! ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ; जाणून घ्या आजचे 10 ग्रॅम सोन्याचे दर
या योजनेबद्दल बांधकाम कामगारांची समाधानाची भावना आहे. बांधकाम कामगार यांच्या म्हणण्यानुसार पैशाचे प्रमाण जरी कमी असले तरी निवृत्तीनंतर सुरक्षा मिळणे महत्त्वाचे आहे. ही योजना केवळ आर्थिक मदत देणारी नाही तर त्यांना त्यांच्या अनेक वर्षांच्या निष्ठेचे आणि कष्टाचे एक सरकारकडून मिळणारे फळ आहे. एकूणच महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली ही पेन्शन योजना बांधकाम कामगारांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याची क्षमता ठेवते. निवृत्तीनंतरच्या त्यांच्या आयुष्यातला एक सुरक्षित आधार मिळतो.
Disclaimer: या लेखाचा उद्देश केवळ सर्वसामान्य जनतेला माहिती देण्याचा आहे. कोणतीही योजना सेवा किंवा आर्थिक मदत मिळवण्यापूर्वी सबंधित शासकीय कार्यालयाचे आणि अधिकृत वेबसाईटवर जाऊन सर्व माहितीची पडताळणी करणे आवश्यक आहे. माहिती देणारा कोणत्याही प्रकारच्या लाभ, नुकसान किंवा गैरसमजासाठी जबाबदार राहणार नाही. या योजनेबद्दल तुम्हाला आणखीन काही माहिती असल्यास अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.