Maharashtra Red Alert : महाराष्ट्रात मान्सून जोरदार असताना पावसाने पुन्हा एकदा कहर करायला सुरुवात केली आहे. मध्यंतरी पासून विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील कामे करण्यास वेळ मिळाला. आणि पुन्हा एकदा पावसाने आता राज्यात हजेरी लावलेली आहे. यात पार्श्वभूमीवरती प्रशासन आता सतर्क झाले आहे. अनेक ठिकाणी शासनाने सूचना जारी करत नागरिकांना आणि शेतकऱ्यांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. Maharashtra Red Alert
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अशातच हवामान खात्याने पुन्हा एकदा पुढील 24 तासांसाठी मोठा हवामान अंदाज उडतोवत रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ जरी केलेला आहे. तसेच पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. गेल्या 24 तासांमध्ये विजेच्या तडाख्यामुळे 8 जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. Maharashtra Red Alert
राज्यामध्ये जोरदार पाऊस पडत असून काही जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे यामुळे प्रशासन अलर्ट मोड वरती आले असून NDRF आणि SDRF चे पथक संच ठेवण्यात आलेली आह. सध्या रत्नागिरी 88.1 मिमी, रायगड 65.3 मिमी सिंधुदुर्ग 53.8 मिमी, ठाणे 29.6 मिमी, यवतमाळ 17.5 मिमी पावसाची नोंद झालेली आहे.
सध्या राज्यात पावसासोबत वीज कोसळण्याच्या घटना देखील घडले आहेत. धुळे, नाशिक, नंदुरबार, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये वीज पडून आठ जणांचा मृत्यू झालेला आहे तर दहा जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. नांगरलेल्या शेत, अंगारात खेळणारी लेकराने रस्त्यावर होणारे प्रवासी कोणावर कधी वीज पडेल याचा नेम नाही.
या पार्श्वभूमी वरती मुंबईमध्ये देखील पावसाने हजेरी लावल्यास हवामान विभागाने या ठिकाणी येलो अलर्ट दिलेला आहे. शनिवारी रात्रीपासून पावसाचा जोर सुरू असेल रविवारपासून तो थोडा मंदावलेला आहे. महापालिकेने माहिती दिली की, कुठेही मोठे पाणी साचलेलं नाही.
प्रशासनाकडून नागरिकांना सादर करण्याचा आवाहन करण्यात आला आहे. नदी ओढ्यांच्या काठावर राहणाऱ्यांनी काळजी घ्यावी, विजा चमकत असताना घराबाहेर पडू नये, आणि डोंगराळ भागात अनावश्यक प्रवास टाळावा, अशा सूचना देण्यात आलेला आहे.
हे पण वाचा | Weather update | महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाची शक्यता, मोठा अलर्ट जारी