Monsoon Rain In Maharashtra: मागील काही दिवसापासून राज्यात होणाऱ्या पावसामुळे आणि आकाशात सतत दिसणाऱ्या ढगांमुळे शेतकरी संभ्रमात आहेत. सतत येणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे व ढगाळ हवामानामुळे तसेच अधून मधून येणाऱ्या सरीमुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये पेरणी साठी मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. दरम्यान हवामान विभागाने सांगितले आहे की, खरा मान्सून 14 जून नंतर सुरू होणार असून त्यापूर्वी पेरणी करणे टाळावे. जेणेकरून तुमच्या बियाचे व खताचे नुकसान होणार नाही व तुम्हाला आर्थिक तोटा सहन करावा लागणार नाही.
यावर्षी राज्यात मे महिन्यातच जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीच्या मशागती करणे बाकी आहे. मात्र यावर्षी लवकर पाऊस सुरू झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात देखील केली आहे. अनेक शेतकऱ्यांनी मे महिन्यातच पेरणीची तयारी सुरू केली आहे. हवामान तज्ञांनी सांगितले आहे की हा पाऊस खरा मान्सून नव्हता. राज्यात खरा मान्सून 14 जून नंतर सक्रिय होणार असून त्यानंतर राज्यात खरा मान्सूनचा पाऊस सुरू होणार आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास थांबावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
हे पण वाचा | सातबारा उताऱ्यांमधील चुकीच्या दुरुस्तीसाठी भूमी अभिलेख विभागाचा नवीन निर्णय! वाचा सविस्तर..
सध्या राज्यात जोरदार वारे वाहत आहे हे वारे मान्सूनशी संबंधित नसून ते वेस्टर्न डिस्टबर्न या पश्चिमेकडून येणाऱ्या हवामान बदलामुळे होत आहे. हे वारे ढग निर्मितीमध्ये अडथळा आणतात आणि त्यामुळे पावसाचा खंड निर्माण होतो. या वाऱ्यामुळे मान्सून लांबण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. अशी माहिती हवामानातज्ञ यांनी दिली आहे.
पेरणीसाठी किती पाऊस असावा?
शेतकऱ्यांनी किमान 100 ते 150 mm पाऊस आणि त्यानंतर पाच ते सहा दिवस सतत हलका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. जमिनीतील ओलावा खूपच महत्त्वाचा आहे. ओलावा तयार झाल्याशिवाय पेरणी केल्यास बियाणाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे चांगला पाऊस होईपर्यंत शेतकऱ्यांनी वाट पाहावी. Monsoon Rain In Maharashtra
हे पण वाचा | पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेत मिळणार पाच लाख रुपयांचा नफा; जाणून घ्या सविस्तर माहिती
लागवडीसाठी योग्य कालावधी कोणता?
खरीप हंगामातील पेरणीसाठी योग्य कालावधी हा 15 ते 30 जून दरम्यानचा असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान खात्याचे अंदाज लक्षात घेऊन पुढील निर्णय घ्यावेत. पेरणीचा काळ निघून गेलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक तेवढा पाऊस पडू तर वाट पहावी आणि त्यानंतरच पेरणी करावी. मे महिन्यात झालेला पाऊस हा अवकाळी पाऊस होता हा पाऊस मान्सूनी पाऊस नसून मान्सूनचा पाऊस आणखीन सुरू होणार आहे असे हवामान तज्ञांनी सांगितले आहे.
मे महिन्यात चक्र वादळामुळे झाला पाऊस
राज्यात मे महिन्यात झालेला पाऊस हा अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे झाला होता. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी तो मान्सूनचा पाऊस समजून पेरणी केली आहे. मात्र बंगालच्या उपसागरात आणि हिंदी महासागरात ढगाची निर्मिती न झाल्यामुळे प्रत्यक्षात मान्सून महाराष्ट्रात पोहोचलेला नाही. मान्सून 14 जून नंतर महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचे स्पष्ट सांगण्यात आले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी महाराष्ट्रात सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतीचा प्रत्येक टप्पा विचारपूर्वक व योग्य नियोजन करून योग्य तो निर्णय घ्यावा. जेणेकरून तुमच्या शेती पिकाचे नुकसान होणार नाही.
हे पण वाचा | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रात या दिवसापासून होणार मुसळधार पाऊस…
मराठवाड्यात मान्सून कधी येणार?
दरम्यान मराठवाड्यात मान्सून 9 ते 18 जून दरम्यान दाखल होणार आहे. आपल्याकडे मान्सून पूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. अनेकांना हा पाऊस मान्सूनचा वाटला मात्र मान्सूनला विलंब झाला आहे. असेही म्हणता येणार नाही मान्सून दाखल होण्यासाठी आणखीन वेळ आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी फार घाई करू नये.
खरीप पिकासाठी लागवडीचा कालावधी 15 ते 30 जून आहे. 75 ते 100 mm पाऊस झाल्यानंतर पुढील पाच ते सहा दिवस हलका पाऊस पडला तर त्यानंतर पेरणी करावी. अशा परिस्थितीत आपण पेरणी करण्याविषयी सूचना करतो मात्र सध्या तरी शेतकरी बांधवांनी पेरणीसाठी घाई करू नये.
मे महिन्यामध्ये अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे काही भागांमध्ये मे महिन्यात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे भारतीय हवामान विभागाने मान्सून आगमन जाहीर केले होते. मात्र बंगालच्या उपसागरात आणि हिंदी महासागरात सध्या पुरेशा प्रमाणामध्ये ढगाची निर्मिती होत नाही. याचा अर्थ असा की अजून मान्सून महाराष्ट्रात दाखल झालेला नाही. त्यामुळे प्रत्यक्षात महाराष्ट्रात मान्सून 14 जून नंतर दाखल होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे.