Rain Alert: सध्या राज्यातील शेतकरी मान्सून बाबत कोणती अपडेट येते याकडे लक्ष देऊन आहेत. मान्सून अपडेट च्या दृष्टीने सध्या महाराष्ट्रात हवामानात बदल होताना दिसत आहेत. यंदा मान्सून ने विक्रमी वेग धारण करून दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी मान्सून महाराष्ट्रात लवकर दाखल झाला आहे. मात्र सुरुवातीच्या जोरदार पाऊसानंतर आता पावसाने विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात सध्या पावसाचा जोर ओसरलेला असून पुढील काही दिवसांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता खूपच कमी आहे. विशेषता 10 जून पर्यंत मोठ्या पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी पेरणी संबंधित कामांमध्ये अजून थोडी प्रतीक्षा ठेवावी असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
हे पण वाचा | लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे खटाखट 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमच्या खात्यात आले का?
राज्यातील या भागात पावसाची शक्यता
मात्र विदर्भातील काही भागासाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. म्हणजेच विदर्भातील काही ठिकाणांमध्ये विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. चार ते सहा जून या कालावधीत पश्चिमेकडून येणाऱ्या चक्रवताच्या प्रभावामुळे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. देशाच्या बहुतांश भागांमध्ये चार ते सात जून दरम्यान पावसाची उपस्थिती राहणार आहे. मात्र अर्जुन नंतर संपूर्ण देशात पावसाची तीव्रता काही प्रमाणात कमी होणार आहे. असा हवामान अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हे पण वाचा | पावसाचा जोर वाढणार! राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी
मान्सून पुन्हा कधी होईल सक्रिय
या काळानंतर दहा ते बारा जून पासून पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने सांगितले आहे. विशेष म्हणजे 15 जून नंतर पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढेल असा अंदाज देखील हवामान खात्यांवर्तवला आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये 15 जून नंतर मुसळधार त्यातील मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरीप पिकाच्या पेरणीसाठी उपयुक्त हवामान तयार होईपर्यंत शेतकऱ्यांनी वाट पाहावी 15 जून नंतर शेतकऱ्यांनी आपल्या कामाची तयारी करावी असे हवामान खात्याने सांगितले आहे. Rain Alert
हे पण वाचा | शिधापत्रिका धारकांसाठी मोठी बातमी! 3 महिन्याचे मोफत रेशन एकत्रित मिळणार; जाणून घ्या काय आहे योजन?
यंदा मान्सूनने सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात पावसाची सुरुवात केली होती. परंतु अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रवाह सध्या मंदावल्यामुळे मान्सूनची गती देखील थांबली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या तुरळक स्वरूपाचा किंवा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागामध्ये पडत असल्याचे दिसत आहे. मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचा चटका आणि उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून संरक्षण घेणे पुरेशे पाणी पिणे आणि उन्हापासून वाचण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.
राज्याच्या हवामानावर नजर टाकल्यास सध्या कोकण मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. तर मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या भागात उष्ण आणि कोरडे हवामान आहे. यामुळे शेतीसाठी पाणी साठवणूक व्यवस्था विहिरीची स्वच्छता बियाणे आणि खताची साठवण यावर भर देण्याची ही योग्य वेळ आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांनी जास्त घाई करू नये जेणेकरून तुमची मेहनत वाया जाणार नाही.
1 thought on “शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रात या दिवसापासून होणार मुसळधार पाऊस…”