पावसाचा जोर वाढणार! राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

Weather Forecast: राज्यातील नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासोबत जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीमध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जना विजेच्या कडकडाट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

राज्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मात्र त्यानंतर मान्सून दाखल झाल्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसत होते. पावसाने उघडी घेतल्यामुळे उन्हाचा चटका आणि उकड्यामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मान्सूनचा प्रवाह कमी झाला असला तरी राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. आज राज्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासोबत पावसाचा अंदाज असल्यामुळे हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील तापमानामध्ये मोठा चढ-उतार होत आहे.

हे पण वाचा | अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई; मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा मोठा निर्णय

ढगाळ हवामान आणि उन्हाचा चटका

राज्यातील कोकणामध्ये व मध्य महाराष्ट्र सोबत काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी ढगाळ हवामानाचा उन्हाचा चटका आणि उघडा वाढत आहे. बुधवारी कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरीने हजेरी लावली आहे. आज कोकणातील ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील धुळे जळगाव नाशिक आईला नगर सातारा सांगली सोलापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर धाराशिव विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात विजयसह वादळी वाऱ्याच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हे पण वाचा | शिधापत्रिका धारकांसाठी मोठी बातमी! 3 महिन्याचे मोफत रेशन एकत्रित मिळणार; जाणून घ्या काय आहे योजन?

राज्यात पुढील तीन दिवस कसे?

राज्यातील पुढील तीन दिवस कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासोबत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही जिल्हे तसेच गाठमाथ्यावर हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केले आहे. दरम्यान मागील काही दिवसापासून मान्सूनचे गती मंदावली असली तरी राज्यातील काही भागात पुढील काही दिवसात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र सह विदर्भ आणि मराठवाडा मधील काही भागात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासोबत मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाळासह पाऊस होणार आहे. Weather Forecast 

राज्यात काही दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या गुजरात राज्यात हवेच्या वाऱ्याच्या थरात चक्रीय स्थिती निर्माण झाले असून ती स्थिती अजूनही कायम आहे. यासोबतच बांगलादेशच्या उत्तर भागातही अशीच चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. ज्याचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावर होताना दिसत आहे. या हवामानात झालेल्या बदलामुळे राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुपारनंतर पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून सकाळच्या सुमारास हवामानात ऊन पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “पावसाचा जोर वाढणार! राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी”

Leave a Comment

error: Content is protected !!