Government news: राज्याच्या विविध भागात गेल्या महिन्याच्या अखेरीस मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान कापणी केलेल्या पिकाचे नुकसान जास्त झाल्याचे समोर आले आहे. अशाप्रकारे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दिले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीत आढावा घेण्यात आला आहे.
दरम्यान मदत आणि पुनर्वसन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सोनिया शेती यांनी राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आणि आवश्यक मदतीची सादरीकरण द्वारे माहिती दिली आहे. त्यावेळी विविध मंत्र्यांनी कापणी केलेल्या पिकाचे नुकसान झाल्याचा मुद्दा उपस्थित करून मदतीची मागणी केली आहे. त्यावर कापणी झालेल्या पिकाची अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान भरून काढण्यासाठी मदत दिली जाणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. Government news
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर मच्छीमारांना देखील मोठ्या नुकसानाचा फटका सहन करावा लागला आहे. मदत पुनर्वसन विभागाने यावर प्रस्ताव सादर करावा अशी सूचना फडणवीस यांनी दिली आहे. खरीप 2025 आणि पुढील कालावधी करिता नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाच्या नुकसानी पोटी देवयाचा भरपाई दर आणि निकष 27 मार्च 2023 रोजी च्या शासन निर्णयानुसार द्याय राहतील. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाप्रमाणे आता दोन हेक्टरच्या मर्यादित मदत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
हे पण वाचा | शिधापत्रिका धारकांसाठी मोठी बातमी! 3 महिन्याचे मोफत रेशन एकत्रित मिळणार; जाणून घ्या काय आहे योजन?
घर दुरुस्तीसाठी 49 कोटीचा निधी
राज्य मंत्रिमंडळाच्या गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत घराच्या पुनर्वसनासाठी व दुरुस्तीसाठी तातडीने मदत निधी द्यावा अशी सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार 49 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. कोकण विभागास पाच कोटी नाशिक विभागात पाच कोटी छत्रपती संभाजी नगर विभागात 12 कोटी अमरावती विभागात पाच कोटी आणि नागपूर विभागात दहा कोटी रुपये असे एकूण 49 कोटी रुपये वितरित करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली आहे.
पावसामुळे रस्ते आणि छोटे फुलांचे नुकसान झाले आहे. त्यांची दुरुस्ती केली जावी असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सांगितले. ग्रामविकास विभागाकडून ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्त करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी शंभूराजे देसाई यांनी केली आहे. यावर गेल्या पंधरा दिवसात ज्या भागात रेड अलर्ट घोषित केला होता, तेथील रस्ते बाबत विचार केला जावा असे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत.
राज्यातील पाणीटंचाईच्या परिस्थितीमध्ये सुधारणा झाली आहे. उजनी धरणात 14.5 पीएमसी जायकवाडी धरणामध्ये 28 पीएमसी पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव दीपक कपूर यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दिली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत टॅंकरने पाणीपुरवठा होणाऱ्या गावांच्या संकेत २०० तर टँकरच्या संकेत 236 ने घट झाली आहे. छत्रपती संभाजी नगर आणि जालना या दोन जिल्ह्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. असे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने सांगितले आहे.
1 thought on “अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई; मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा मोठा निर्णय”