RCB VS PBKS : आयपीएलचा मौसम भरात आलाय की प्रत्येक चहा त्याच्या हृदयात धडधड वाढत असते. पण यंदा आयपीएल 2025 चा शेवटचा सामना म्हणजे फायनल एक वेगळीच उत्कंठा घेऊन येतोय. कारण या वर्षीचा अंतिम सामना कोणा जुन्या चॅम्पियन संघ नाही, तर पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकण्यासाठी सज्ज असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि पंजाब किंग्स (PBKS) या दोन्ही हमी नव्हे पण हमखास संघांमध्ये रंगणार आहे. पण सगळ्यांची उत्सुकता एका वेगळ्याच कारणाने वाढली आहे ते म्हणजे पावसाच सावट! RCB VS PBKS
फायनलचा दिवस जवळ पण पावसाचं संकट डोक्यावरती
आज तीन रोजी अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल 2025 ची फायनल खेळवली जाणार आहे. पण हवामान खात्याचा अंदाजानुसार त्या दिवशी पावसाचे शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजे क्रिकेट प्रेमींच्या स्वप्नात पाणी फिरू शकतो!.
क्वालिफायर एक मध्ये पंजाब वर मात करत आरसीबीने फायनल मध्ये दमदार एंट्री केली होती. तर मुंबई इंडियन्सला हरवून पंजाब किंग्स ने इतिहास रचत अंतिम टप्प्यात आपलं पाऊल ठेवलं. दोन्ही संघ आजवर कधीच आयपीएल ट्रॉफी जिंकू शकले नाहीत. त्यामुळे यावेळी कोणताही संघ जिंकला, तरी पहिल्यांदा विजेता होणार हे नक्की आहे!
पावसामुळे सामना झाला नाही तर काय होणार?
जर तीन जूनला पावसामुळे सामना मध्ये अडथळा आला असेल तर BCCI ने त्यासाठी काही ठोस निर्णय घेतलेले आहेत. सामना वेळेत सुरू न झाल्यास दोन तासाचा अतिरिक्त वेळ दिला जाईल. 3 जून सामना शक्य न झाल्यास, 4 जून हा रिझर्व डे म्हणून राखीव ठेवण्यात आलेला आहे. तर रिझर्व डे च्या दिवशीही एकही चेंडू फेकला गेला नाही, तर मग लीग टप्प्यात जास्त गुण असलेल्या संघाला थेट विजेता घोषित करण्यात येईल.