Weather forecast : राज्यातील वातावरणात एक मोठा बदल झाला आहे. भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा हवामान अंदाज वर्तवत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे आज आम्ही दोन दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.Weather forecast
एकीकडे उन्हाच्या तडाख्याने हैरण झालेल्या महाराष्ट्राला आता पुन्हा एकदा हवामानाचा सामना करावा लागणार आहे. हवामान विभागाने (IMD) राज्यातील काही भागात पावसाच्या सरींचा इशारा दिला असून, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आगामी दोन दिवसात वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे.
दक्षिनेतील वाऱ्यांमुळे वातावरणात बदल
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, दक्षिण भारताच्या दिशेने बंगालचे उपसागरात मिळणाऱ्या दमट वारांचा प्रभाव महाराष्ट्रावरती दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक तापमान वाढीच्या परिणामी उंची ढगांची निर्मिती होत आहे. यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, बीड, लातूर आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये 29 व 30 एप्रिल दरम्यान पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
या अचानक हवामानात बदल झाल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या संभ्रमात पडलेला आहे. बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शेतकरी रामभाऊ देशमुख म्हणतात, “गेल्या आठवड्यातच आमच्याकडे काही ठिकाणी जमीन नांगरणी सुरू झाली होती, पण आता पावसामुळे ते काम थांबले. मका आणि कापसाची पेरणी करायची की थांबायचं हे समजत नाही”
तर या आधी विदर्भात भंडारा, गोंदिया आणि अमरावती ते वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये मका भाजीपाला व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. काही भागांमध्ये विजा कोसळण्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत. त्यामुळे राज्यातील इतर भागात नागरिकांनी शेतकरी ही आता हवामान खात्याच्या प्रत्येक इशाराकडे विशेष लक्ष देत आहेत.
तापमानात झालेली गट परंतु पुन्हा उष्णता वाढणार सध्या पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने तापण्यात गट होणार असली तरी हवामन तज्ञांनी व्यक्त केलेले अंदाज मध्ये हा तात्पुरता परिणाम आहे. मी च्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा एकदा तापमानात झपाट्याने वाढवणार आहे. यामुळे नागरिकांनी सावध राहणे आणि काळजी घेणे आवश्यक असल्याचा म्हटले आहे.
राज्यातील अनेक धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा असल्यामुळे सध्या तर पाणीटंचाईचा प्रश्न उपस्थित नाही जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख धरणामध्ये 15 जुलै पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे त्यामुळे शहरी भागात पाणीपुरवठा सुरळीत राहण्याची शक्यता वर ठेवली आहे.
हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा अंदाज; अति मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज