Monsoon Update 2025: मे महिना उघडताच उन्हाच्या झळा अंगावर येऊ लागतात आणि डोकं तापायला लागतं. शेतीच्या कामांना सुरुवात व्हायची तयारी होते, पण पावसाच्या आगमनाची वाट पाहणं सुरू राहते. पण पावसाच्या आगमनाची वाट पाहणं सुरू राहत. मात्र एक बातमी शेतकऱ्यांसाठी मिळाली आहे. भारतात आणि विशेषता महाराष्ट्रात यंदा नैऋत्य महोत्सव पावसाचा आगमन वेळी यादीत होणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मान्सून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत पोहोचणार आहे आणि यंदात्याच्या आगमनाची शक्यता तब्बल 93.8 टक्के असल्याच सागितलं जात Monsoon Update 2025
ही बातमी एक शहरातल्या लोकांसाठी नाहीतर, राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या आशेच किरण आहे. कारण मान्सून जर वेळेवर आणि जोरदार आला, तर खरीप हंगामाचा पाया भक्कम होतो. वेळेवर पाऊस पडल्यास बियाणं, खत आणि मशागतीची काम वेळेवर होतात. सध्या शेतकरी महागाईच्या विळ्याख्यात अडकलेला असताना, पावसाची साथ मिळणे ही सुद्धा निम्मी लढाई जिंकण्यासारखी गोष्ट ठरेल.
मान्सूनसाठी आकाशाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी
पाणीटंचाई, वीहिर कोरड्या, नद्या सुकलेल्या आणि धरणात साठा कमी हीच सध्या बहुतांश गावाची सध्या हीच परिस्थिती. त्यामुळे मान्सून लवकर येतोय ही बातमी अनेकांसाठी उभारी देणारी आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, यंदाचा मान्सून केरळमध्ये वेळ आधी दाखल होईल आणि त्यानंतर त्याचा प्रवास महाराष्ट्राच्या दिशेने झपाट्याने सुरू होईल. दरवर्षी मान्सून साधारण 10 जून च्या आसपास महाराष्ट्रात पोहोचतो, पण यंदा तो जूनच्या पहिल्या आठवड्यातच येणार आहे.
खरीप अंगामध्ये सुरत पावसाच्या वेळेवर आगमनावरच ठरते. जर वेळेत पाऊस आला, तर सोयाबीन, भात, मका, बाजरी, सूर्यासारख्या पिकांची पेरणी योग्य वेळी होऊन चांगलं उत्पादन मिळण्याची शक्यता वाढते. पावसाचा उशीर झाला की जमीन सुकते, बियाणं कुजता, आणि उत्पादनावर थेट परिणाम होतो. यामुळे यंदाच्या वेळी मान्सून वेळ आधी आल्यामुळे शेतकरी सुद्धा आनंदात आहे.
मुंबईकरांना उकाड्यातून मिळणार हायस वाटणारा श्वास
शहरात मात्र वेगळ चित्र आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली, कल्याण, पालघर, विरार या परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा कर वाढत चालला आहे. विजेची मागणी देखील वाढली आहे, पाणीटंचाईचे प्रश्न आहेत आणि नागरिक उष्णतेने त्रस्त झाले आहेत. यावर पावसाचा एका सरीनेच दिलासा मिळू शकतो. त्यामुळेच मुंबईकर सुद्धा आकाशाकडे पाहत आहेत आणि मान्सूनची वाट पाहत आहेत.
हवामान खात्याचा अंदाजानुसार, यंदा मुंबईमध्ये एक जून ते सात जून दरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. अर्थात यामध्ये स्थानिक परिस्थिती वाऱ्यांचा वेग, तापमान, आद्रता यांचा परिणाम असतो, पण सध्याच्या स्थितीत कोणतेही अडथळा नसल्यामुळे लवकर पाऊस येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मान्सून पूर्व वादळ आणि पाऊस नागरिकांनी घ्यावी काळजी.
मानसून येण्याच्या आधी काही दिवस हे मान्सून पर्व कालखंड म्हणून ओळखले जातात. या काळामध्ये काही ठिकाणी अचानक वादळ, विजा, जोरदार वारे आणि हलका पाऊस पडतो. यंदा असच वातावरण विदर्भात आणि मराठवाड्यात निर्माण झाला आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलेले आहे.
चेष्टा शेतकरी बांधवांसाठी आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी या काळात काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आकाशात विचा चमकात असताना शेतात काम करणे, ओले कपडे घालून राहणं, विजांच्या खांबाजवळ जाण हे सर्व टाळणे गरजेचे आहे. तसेच पावसाळ्याच्या सुरुवातीलाच घराची छप्पर, नाली, अडसळ, कडू निंब विहीर यांची देखभाल करून घेणे गरजेचे आहे.
जलसाठ यांना दिलासा मिळण्याची शक्यता
सध्या राज्यात अनेक प्रमुख धरणांमध्ये जलसाठा अत्यंत कमी झाला आहे. कोयना, जायकवाडी, उजनी, भतसा, भंडारदरा, वारणा, तुळशी आधी धरणात 15% पेक्षा कमी पाणी साठा शिल्लक आहे. अनेक गावांना पाण्यांचे टँकर चालू झालेले आहेत. त्यामुळे मान्सून वेळेवर आल्यास हे धरण भरतील, नद्या वाहू लागतील, आणि पाण्याच्या संकटावरती थोडेफार मर्यादा होईल.
कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुरू
मान्सूनपूर्व आगमनाची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना वेळेवर मशागत करण्याचा आणि बियाणं खतं औषध यांचा साठा करून ठेवण्याचा आवाहन करण्यात आलेला आहे. यंदा पेरण्या लवकर होतील यासाठी बियाणं साक्षरता मोहीम राबवली जात आहे. गाव पातळीवरती कृषी सहाय्यक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असून माहिती देण्याचे काम करत आहेत.
मान्सून कडे सगळ्यांचे लक्ष – शहर असो वा गाव
गावात पेरणी, खत, गुरहळ, विहिरी, तलाव यांचं नियोजन सुरू झालेला आहे. हे सगळं पाहता, पाऊस म्हणजे फक्त निसर्गाचा प्रसाद नाही, तर तो एक सामाजिक आणि आर्थिक चक्र चालवणारी शक्ती आहे.
यंदा पाऊस आला लवकर येतो ही बातमी फक्त हवामान खात्यासाठी मर्यादित राहू नये, तर प्रत्येक नागरिकांनी त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. सुरक्षितता, स्वच्छता आणि नियोजन या गोष्टींचा विचार केला पाहिजे. यावर्षी मान्सून लवकर येतोय यामुळे शेतकऱ्यांच्या अशा वाढल्या आहेत आणि त्यांना एक मोठा फायदा होणार आहे.
हे पण वाचा | IMD Alert | राज्यावर अवकाळी पावसाचे मोठे संकट! IMD चा अलर्ट; तर या भागात पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4 thoughts on “शेतकऱ्यांनो तयारीला लागा! मान्सून लवकर येणार! या तारखेला होणार महाराष्ट्रात दाखल वाचा सविस्तर”