7/12 उताऱ्यासंदर्भात शासनाचा मोठा निर्णय! 1 ऑगस्ट पासून होणार नवीन नियम लागू

7/12 News : शेतकरी असाल तर हे बातमी नक्की वाचा, कारण राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादा एक बातमी समोर आलेली आहे. सातबारा, 8 अ, फेरफार उतारा, इ रेकॉर्ड सारख्या जमिनीशी संबंधित कागदपत्रासाठी आता ना कोणता सेतू केंद्रात फेरा मारायची गरज नाही दलालांची हैराण करणारा अनुभव! कारण एक ऑगस्ट पासून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना ही कागदपत्र थेट त्यांचे मोबाईलवर, तीही व्हाट्सअप ॲप वर मिळणार आहेत.

ही नवी सुविधा शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने सुरू केली असून, ती संपूर्ण राज्यात लागू होणार आहे. खास बाब म्हणजे, ही सेवा अत्यंत पारदर्शक आणि सुरक्षित असल्याने फसवणुकीलाही चाप बसेल. आता पंधरा रुपयांमध्ये शेतकऱ्याला घरबसल्या सातबारा उतारा मिळणार हेच खऱ्या अर्थाने डिजिटल महाराष्ट्र आहे.7/12 News

रांगा नाहीत, दलाल नाहीत, थेट मोबाईलवर कागदपत्र

या आधी शेतकऱ्यांना सातबारा, 8 अ किंवा फेरफार उत्तरासाठी महा सेवा केंद्र किंवा खाजगी सुविधा केंद्रावर जाणं भाग पडतात. आता यात वेळ खर्च आणि कधी कधी फसवणूक ही ओढावायची. पण आता ही कागदपत्रे व्हाट्सअप ॲप वर मिळणार असल्याने मधल्या मध्ये कोणीच नाही. दलालांच साम्राज्य संपणार आहे.

सेवा कशी मिळणार?

शेतकऱ्यांनी महा भूमि पोर्टलवर जाऊन आपला मोबाईल नंबर नोंदवायचा आहे. एकदाच 50 रुपयांचा नोंदणी शुल्क भरायचा आहे. नंतर मोबाईलवर ओटीपी येऊन पडताळणी होईल. आणि मग सुरू होईल डिजिटल सुविधा थेट मोबाईलवर सातबारा मिळण्याची!

काय काय मिळेल whatsapp ॲप वर?

सातबारा, 8 अ, फेरफार उतारा, आणि ई रिकॉर्ड्स जमिनी संबंधित माहिती सेवा आणि कायदे कानून, प्रक्रिया मार्गदर्शन जमिनीच्या नोंदणीत बदल झाल्यास थेट सूचना व्हाट्सअप ॲपवर.

कधीपासून लागू होणार ही योजना?

15 जुलै ही सेवा प्रयोग स्वरूपात सुरू होणार असून एक ऑगस्ट 2025 पासून संपूर्ण महाराष्ट्रातील लागू होणार आहे अशी माहिती सरिता नरके, प्रभारी अतिरिक्त जमाबंदी आयुक्त पुणे यांनी दिली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!